पालघर:(सत्यवान तरे) आदिवासी बांधवांना जंगलातील त्यांच्या हक्काच्या बनडक्क पट्ट्यात शेती करणे, शेतीसाठी विहीर अथवा शेतात पर बांधणे हे सर्वाधिकार मिळणार असे राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले. ठोयापाठा ता. विक्रमगड येथे वयम चळवळ या सामाजिक संस्थेने आदिवासी बांधवांसाठी राज्यपाल श्री.कोश्यारी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते. केंद्र शासन व राज्य शासन ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पायाभूत सुविधा मिळाव्या यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून काम करत आहे. आपल्या भागात आल्यावर शासनाच्या योजना आपल्यापर्यंत पोहचल्या असल्याचे पाहिले आहे. लोयापाठा या आदिवासी बहुल तसेच दुर्गम भागात बिज, पाणी, स्वयंपाकासाठीचा गॅस, स्थानिक रस्ते, स्वस्त भान्य दुकाने उपलब्ध झाले आहे, असेही श्री. कोश्यारी यांनी सांगितले. आदिवासी बांधवांना वनहक्क पट्ट्यातील अधिकार देण्यात आले आहेत. ज्यांना वनहक्क पट्याचे हक्क अद्याप प्राप्त झाले नाहीत त्यांना लवकरच बनहक्क प्राप्त होतील, असेही राज्यपाल कोश्यारी त्यांनी सांगितले. होयापाठा येथील कार्यक्रमासाठी येत असताना मार्गावरील जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांनी राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत केले. यावेळी विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र बारभुवन, सर्वत्री उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, विकास गजरे, अर्चना कदम, संदिप पवार, संजय अडिरे आदि विविध विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
आदिवासी बांधवांना वनहक्क पट्ट्यात सर्वाधिकार मिळणार पट्ट्यात सर्वाधिकार