ठाणे: ठाणे महानपालिकेच्या महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजनेअंतर्गत सहा नागरी पुनरुध्यान आराखड्यांना (अर्जन रिन्ल्यूअल प्लॅन) राज्य सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. किसननगर, कोपरी, ठाण्यातील सहा राबोडी, हाजुरी, टेकडी अंगला आणि लोकमान्य नगर या सहा गूआरपींना राज्य सरकारने मंजुरी दिली असून या योजनेची अंमलबजावणी नियमानुसारच होत असल्याचा खुलासा महापालिकेच्यावतीने करण्यात आला आहे. तथापि आवश्यक त्या मंज-या प्राप्त नसतानाही क्लस्टर योजनेची अंमलबजावणी होत आहे म्हणणे संयुक्तीक नाही असाही खुलासा महापालिकेच्यावतीने केला आहे. शहरातील मोठ्या प्रमाणातील जुन्या भोकादायक इमारती, अनधिकृत इमारती, झोपडपट्टी यामुळे शहराची सुनियोजित आणि सुनियंत्रित पुनर्बाधणी करणे सार्वजनिक व्यापक जनहिताच्या दृष्टीने आवश्यक होते. हे लक्षात घेऊन योजनांना महापालिकेने 'समूह विकास योजना' या महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या सहा नागरी पुनरुथ्थान आराखड्यांचे प्रस्ताब राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केले होते. या सर्व आराखयांना राज्य शासनाने आज मंजुरी दिली आहे. __ सद्यस्थितीत एकूण ४४ परिसराच्या नागरी पुनरूत्थान आराखाउयांचे जवळपास १५०८.९३ हेक्टर इतक्या क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी कोपरी, हाजुरी, टेकडी बंगला, लोकमान्यनगर, किसननगर आणि राबोडी या परिसराची प्राधान्याने निवड करण्यात आली आहे. या योजनेमुळे ठाणेकरांना परवडणारी भरे उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प टप्प्याटप्प्यामध्ये विकसित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात किसननगर येथील प्रकल्पांचा ६ फेब्रुवारी २०२० रोजी शुभारंभ करण्यात येणार आहे. समुह नागरी विकास योजनेतंर्गत शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सुविधा उपलब केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रशस्त क्रीडांगण, सांस्कृतिक केंद्र, सुरक्षा, महिलाबचत गटांसाठी स्वतंत्र जागा, तसेच कम्युनिटी सेंटर, सिटी सेंटर, टाऊन सेंटर अशा अनेक आंतरराष्ट्रीय सुविधांचा सरकारची समावेश या योजनेत असणार आहे. या परिसरातील नागरी पुनरुभ्यान आराखड्यांमधील नागरी समुहांचे ( क्लस्टर योजनेचे ) विकसन प्रामुख्याने भूख उभारकांच्या तसेच भोगवटाधारकांच्या गृहनिर्माण संस्थेमार्फत टप्याटप्याने करण्यात येणार आहे. सदर योजनेमुळे अस्तित्वातील भोगवटाभारकांना जरी ते अनधिकृत बांधकामांमध्ये वास्तव्य करीत असले तरीही उक्त नियमावलीतील तरतुदीनुसार पात्र ठरल्यास त्यास त्यांचे राहत्या घराइतके घर पुनर्विकासात प्राप्त होणार आहे. सदर योजना ही प्रामुख्याने भूखं उभारक, भोगवटाधारकांची गृहनिर्माण संस्था यांच्या मार्फत होणार असून पुनर्विकासात घरांचा ताबा सुरक्षित शिर्षकासह त्यास उपलब्ध राहणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून नागरी समुह विकास योजनेसाठी महापालिकेकडून अनेक अथक प्रयत्न करण्यात आले असून योजनेकरिता संपूर्ण महापालिका क्षेत्र विचारात घेऊन नागरी सुविधा मूल्यांकनही करण्यात आले आहे. हे मूल्यांकन आधारभूत भरुनच नागरी पुनरुध्यान आराखडे ठाणे महानगरपालिकेने तयार केले असून त्याप्रमाणे अंमलबजावणी करणेत येणार आहे.
ठाण्यातील सहा क्लस्टर योजनांना राज्य सरकारची मंजुरी